/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

Swatatrya Din Bhashan 6


स्वातंत्र्य दिन मराठी भाषण क्र. 6



 

स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्षाच्या जल्लोषात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.आज 15 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी मिळून भारताचा ध्वज फडकवतो.कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र होऊन स्वतंत्र राष्ट्र बनले.एकेकाळी भारताला सोन्याचा पक्षी म्हटले जायचे हे आपण सर्वजण जाणतो.पण मसाल्याच्या व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार या धोरणाने भारत काबीज करून भारतीयांची अशी दुर्दशा केली की भारतीय इंग्रजांचे गुलाम झाले.अशा वेळी भारतात असे काही शूर पुत्रही जन्माला आले.ज्यानी भारतात क्रांतीची लाट उठवून देश स्वतंत्र केला.देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेकवेळा तुरुंगवास भोगला.देशासाठी आपले रक्त सांडले प्रसंगी या देशाच्या मातीसाठी लढता-लढता शहीद झाले.भारतमातेच्या सुपुत्रांच्या बलिदानामुळे इंग्रज देश सोडून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.स्वातंत्र्यानंतर आजही आपण सर्वजण एकात्मतेने राहून सिद्ध केले आहे की आजही भारत सोन्याच्या पक्षापेक्षा कमी नाही.कारण अनेक जाती-धर्माचे लोक एकात्मतेने व आनंदाने राहतो.आम्हा सर्वांच्या या एकतेच्या रंगासमोर सोन्याचा रंग फिका पडला आहे.
भारत हा जगातील एकमेव देश आहे
जिथे आरती होते,अजान होते.
येथे हिंदू आहेत,मुस्लीम आहेत,
जैन,बौद्द,शिख आहेत.
आम्हाला गर्व आहे की आमचा देश भारत आहे..



















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा