इयत्ता - 7वी
माध्यम - मराठी
विषय - विज्ञान
अभ्यासक्रम - सुधारित अभ्यासक्रम 2024-25
भाग - 1
प्रकरण 2 - प्राण्यांचे पोषण2.Animal nutrition
पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय
1. रिकाम्या जागा भरा.
(a) मानवातील पोषणाचे मुख्य टप्पे अन्न घेणे अंतर्ग्रहण,पचन,शोषण,अन्नाचे एकजीव होणे) आणि मलविसर्जन
हे आहेत.
(b) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे.
(c) जठर हे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पाचकरस मुक्त
करते जे अन्नावर काम करतात.
(d) लहान आतड्यातील आतल्या भिंतीवर बोटासारखे बाहेर आलेले छोटे
भाग असतात, त्यांना शोषणेंद्रिये
म्हणतात.
(e) अमिबा आपले अन्न अन्नविवरामध्ये
पचवतो.
- खाली दिलेली विधाने
वाचून त्यातील बरोबर विधानासमोर (√) व चुकीच्या विधानसमोर (x) लिहा.
(a) स्टार्चचे पचन जठरात होते. (x)
(b) अन्नामध्ये लाळ मिसळण्यासाठी जीभ मदत करते. (√)
(c) पित्ताशय पित्तरसाचा तात्पुरता संग्रह करते. (√)
(d) रवंथ करणारे प्राणी गिळलेले गवत परत तोंडात आणून त्याचे
चर्वण करतात. (√)
- खाली दिलेल्या विधानाला
संबंधित योग्य पर्यायासमोर (√) खूण करा.
(a) फॅटस्चे संपूर्ण पचन यात होते.
(i) जठर
(ii) तोंड
(iii) लहान आतडे (√)
(iv) मोठे आतडे
(b) पचन न झालेल्या अन्नातील पाणी येथे शोषले जाते.
(i) जठर
(ii) अन्ननलिका
(iii) लहान आतडे
(iv) मोठे आतडे (√)
4. स्तंभ I मध्ये दिलेल्या घटकांचे स्तंभ II मधील घटकाशी जोड्या जुळवा.
स्तंभ - I (अन्नघटक) |
स्तंभ - II (पचनानंतर तयार झालेले उत्पादन) |
कार्बोहैड्रेटस् |
साखर |
प्रोटीन्स |
अमिनो
आम्ल |
फॅटस् |
फॅटी
आम्ल आणि ग्लिसरॉल |
- शोषणेंद्रिये
म्हणजे काय? ती कोठे असतात व त्यांचे कार्य काय?
उत्तर:
शोषणेंद्रिये
म्हणजे काय?
लहान
आतड्यामध्ये बोटांच्या आकाराचे हजारो छोटे भाग असतात, त्यांना शोषणेंद्रिये म्हणतात.
ती
कोठे असतात?
शोषणेंद्रिये
लहान आतड्याच्या आतल्या भिंतीवर असतात.
त्यांचे
कार्य काय?
शोषणेंद्रिये
पचलेल्या अन्नातील पोषक घटक शोषून घेण्यासाठी आपला पृष्ठभाग वाढवतात. ही
शोषणेंद्रिये पचलेले अन्न (अन्नरस) शोषून घेतात. हा अन्नरस रक्ताच्या नसांमधून
(रक्तवाहिन्यांमधून) शरीरातील वेगवेगळ्या भागांना पाठवला जातो.
- पित्तरस
कोठे तयार होतो? अन्नाचा कोणता घटक पचण्यासाठी तो मदत करतो?
उत्तर:
पित्तरस
यकृतामध्ये तयार होतो. हा पित्तरस आपण खाल्लेल्या स्निग्ध (फॅट्स) पदार्थांचे पचन
करण्यास खूप मदत करतो.
- रवंथ
करणाऱ्या प्राण्याकडून पचन होते परंतु मानवाकडून होत नाही अशा
कार्बोहैड्रेटच्या प्रकाराचे नाव सांगा. याचे कारण देखील द्या.
उत्तर:
गवतामध्ये
काष्ठतंतू (सेल्युलोज) नावाचे एक कार्बोहैड्रेट असते.
रवंथ
करणाऱ्या प्राण्यांच्या (उदा. गाय, म्हैस) शरीरात लहान आतडे आणि मोठे आतडे यांच्यामध्ये एका
पिशवीसारखा भाग असतो, त्याला
अंधनाळ म्हणतात. या अंधनाळमध्ये काही सूक्ष्मजंतूंच्या मदतीने गवतातील काष्ठतंतू
पचवले जातात.
मानवामध्ये
अंधनाळ हा अवयव पूर्णपणे विकसित नसल्यामुळे किंवा त्यात ते सूक्ष्मजंतू नसल्यामुळे
काष्ठतंतूचे पचन मानवाकडून होऊ शकत नाही.
- ग्लुकोजपासून
आपल्याला तात्काळ ऊर्जा कशी मिळते?
उत्तर:
जेव्हा
आपण ग्लुकोज घेतो, तेव्हा ते
ऑक्सिजनच्या मदतीने लगेच शरीरातील पेशींमध्ये मिसळते. यामुळे शरीराला लगेच कार्बन
डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा मिळते.
म्हणूनच ग्लुकोजपासून आपल्याला तात्काळ ऊर्जा मिळते.
9. अन्नमार्गातील कोणता अवयव या क्रियेत सहभागी
असतो?
उत्तर:
(i) अन्नाचे शोषण: लहान आतडे
(ii) अन्नाचे चर्वण (चावणे): तोंड (मुख)
(iii) सूक्ष्मजंतूचा नाश करणे: जठर
(iv) अन्नाची पूर्ण पचन: लहान आतडे
(v) मलाची निर्मिती: मोठे आतडे
10. स्तंभ 1 मध्ये दिलेल्या अवयवांचे स्तंभ - II मध्ये दिलेल्या कार्याशी जोड्या जुळवा.
उत्तर
-
स्तंभ - I (अवयव) |
स्तंभ - II (कार्य) |
(a) लाळ ग्रंथी |
लाळेचे
स्रवण (लाळ तयार करणे) |
(b) जठर |
आम्ल
(ऍसिड) बाहेर सोडणे |
(c) यकृत |
पित्तरस
तयार करणे |
(d) मलाशय |
न
पचलेले अन्न साठवणे |
(e) लहान आतडे |
पचन
पूर्ण करणे |
(f) मोठे आतडे |
पाण्याचे
शोषण करणे |
11. मानव आणि अमिबा यांच्या पोषण क्रियेतील एक
साम्य आणि एक फरक लिहा.
उत्तर:
साम्य:
- मानव:
मानवामध्ये लहान आतड्यातून पाचक रस
(पचवणारे द्रव) बाहेर येतो. या पाचकरसामुळे अन्नाचे पचन होते.
- अमिबा:
अमिबाच्या अन्नविवरामध्ये (Food
Vacuole) पाचक रस बाहेर येतो आणि
या पाचक-रसामुळे अन्नाचे पचन होते. थोडक्यात, दोघांमध्येही अन्नाचे पचन करण्यासाठी पाचक रसाचा वापर
होतो.
फरक:
- मानव:
मानव तोंडातून अन्न घेतो. मानवाच्या
पचनसंस्थेतील वेगवेगळ्या भागांमध्ये टप्प्याटप्प्याने अन्नाचे पचन होते.
मानवामध्ये अन्नपचन ही एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
- अमिबा:
अमिबा छोटे सूक्ष्मजीव खातो. जेव्हा
त्याला अन्नाची जाणीव होते, तेव्हा तो आपल्या शरीरातील खोट्या पायांनी (छद्यपाद)
अन्नकणाकडे जातो आणि त्याला गिळतो. अन्नविवरामध्ये तो अन्नकण अडकतो आणि तिथे
त्याचे पचन होते. ही प्रक्रिया मानवापेक्षा सोपी आहे.
12. आम्ही कच्ची पालेभाजी / गवत खाऊन जगू शकतो का? चर्चा करा.
उत्तर:
आपण जगण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून आहोत. आपण आपले अन्न
स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे, आपण
जगण्यासाठी थेट किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून आहोत.
आपल्या चांगल्या वाढीसाठी मानवाला संतुलित आहार लागतो.
वेगवेगळ्या अन्नघटकांपासून मानवाला वेगवेगळी पोषकद्रव्ये मिळतात. या सर्व घटकांचे
मूळ जरी वनस्पती असल्या तरी, फक्त
कच्ची पालेभाजी किंवा गवत खाऊन मानवाला आवश्यक असलेली सर्व पोषकद्रव्ये मिळणार
नाहीत. त्यामुळे मानव फक्त कच्ची पालेभाजी किंवा गवत खाऊन जगू शकणार नाही.
जर एखादी खूप आपत्कालीन (आपत्कालीन) परिस्थिती आली, जसे की दुष्काळ किंवा संकट, अशा वेळी मानव कच्च्या पालेभाज्या किंवा गवत खाऊन जगू शकेल.
पण यामुळे त्याला कुपोषण, आजार आणि दैनंदिन कामे करण्यासाठी ऊर्जेची कमतरता
या समस्यांना सामोरे जावे लागेल.
म्हणून, आपण कच्च्या पालेभाज्या किंवा गवत खाऊन काही काळ नक्कीच जगू
शकतो,
पण हा मानवासाठी कायमस्वरूपी आणि पूर्ण आहार नाही.
टिप्पणी पोस्ट करा