CLASS - 10 

MEDIUM - MARATHI 

SUBJECT - Social Science 

SYLLABUS - KARNATAKA STATE 

BOARD - KSEAB

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

पाठ  २ - ब्रिटिश सत्तेचा विस्तार

पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली 

    कर्नाटक राज्यातील सर्व शाळांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून 'पाठ-आधारित मूल्यमापन परीक्षा' (Lesson Based Assessment - LBA) प्रणाली अंमलात येणार आहे. हा बदल शिक्षण गुणवत्तेत वाढ करेल का, याबद्दल शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.

काय आहे नवीन प्रणालीचा उद्देश?

सध्या सरकारी शाळांमध्ये रचनात्मक मूल्यमापन (FA – Formative Assessment) आणि संकलनात्मक मूल्यमापन (SA – Summative Assessment) या पद्धती वापरल्या जातात. नव्या LBA प्रणालीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या आकलनाची आणि त्यांच्या शिकण्याच्या गुणवत्तेची सातत्याने खात्री करणे हा आहे. प्रत्येक पाठ किंवा अध्याय शिकवून झाल्यानंतर लगेचच छोटी चाचणी घेतल्याने विद्यार्थ्यांना विषय किती समजला हे स्पष्ट होईल. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांच्या गुणांसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भविष्यात होणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी ही सुरुवातीपासूनची मूल्यमापन पद्धत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने व्यक्त केली आहे.

अंमलबजावणी आणि स्वरूप:

    ही घटक चाचणी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (DSERT) या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करून शाळांना पुरवेल. शाळांना या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मिळालेले गुण 'SATS' पोर्टलवर (Student Achievement Tracking System) अपलोड करावे लागतील, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल.

प्रत्येक चाचणी ३० गुणांची असेल आणि त्यात २५ प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेची रचना विशिष्ट प्रमाणात सोपे, सामान्य आणि कठीण प्रश्नांच्या मिश्रणाने केली जाईल:

६५% सोपे प्रश्न

२५% सामान्य प्रश्न

१०% कठीण प्रश्न

    बहुतेक प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासणे सोपे होईल. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रिकाम्या जागा भरणे, चित्रांना रंग भरणे, जोड्या जुळवा आणि गटात न बसणारा शब्द ओळखणे असे मनोरंजक प्रश्न असतील.

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

पाठ  २ - ब्रिटिश सत्तेचा विस्तार

·      भारतात ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्याचा विस्तार कोणत्या मार्गाने केला याची यादी करा.

·      अँग्लो-मराठा युद्धे स्पष्ट करा.

·      सहाय्यक सैन्य प्रणाली (Auxiliary Army System) स्पष्ट करा.

·      अँग्लो-शीख युद्धे स्पष्ट करा.

·      दत्तक वारस नामंजूर धोरण (Doctrine of Lapse) समजून घ्या.

I. प्रत्येक प्रश्न किंवा अपूर्ण विधानासाठी चार पर्याय दिले आहेत. त्यातून एक योग्य उत्तर निवडा आणि ते त्याच्या अक्षरासह पूर्ण उत्तर लिहा.

1.    पहिले अँग्लो-मराठा युद्ध ___________ च्या कराराने समाप्त झाले. (सप्टेंबर-२०२०) (सोपे)

a) बेसिन

b) सालबाई

c) लाहोर

d) पुणे

2.   तैनाती फौजेची (Subsidiary Alliance) पद्धत ___________ यांनी सुरू केली. (सप्टेंबर-२०२२) (सोपे)

a) लॉर्ड डलहौसी

c) रॉबर्ट क्लाईव्ह

b) लॉर्ड वेलस्ली

d) काउंट डी लॅली

3.   तैनाती फौजेची पद्धत स्वीकारणारे पहिले राज्य (मध्यम) (एप्रिल-२०२३)

A) हैदराबाद

B) म्हैसूर

C) मराठा

D) शीख

4.   तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर ब्रिटिशांनी सातारा येथे स्थापित केलेला पारंपरिक नेता (मध्यम)

A) संभाजी

B) शिवाजी

C) शहाजी

D) प्रताप सिंह

5.   दत्तक वारस नामंजूर धोरण (Doctrine of Lapse) लागू करणारा (सोपे)

A) लॉर्ड डलहौसी

B) लॉर्ड वेलस्ली

C) रॉबर्ट क्लाईव्ह

D) काउंट डी लॅली

6.   पंजाबला ब्रिटिश साम्राज्यात जोडणारा (मध्यम) (एप्रिल-२०२४)

(A) डलहौसी

(B) वेलस्ली

(C) रॉबर्ट क्लाईव्ह

(D) कॉर्नवॉलिस

7.   दुसरे अँग्लो-मराठा युद्ध ___________ च्या कराराने समाप्त झाले. (जून-२०२३) (सोपे)

a) बेसिन

b) सालबाई

c) लाहोर

d) पुणे

II. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्या.

1.    शिखांना यशस्वीपणे कोणी संघटित केले? (मध्यम)

2.   तैनाती फौजेची प्रणाली (System of Subsidiary Alliance) म्हणजे काय? (मध्यम)

3.   वेलस्लीने राजीनामा देऊन ब्रिटनला परत का गेले? (कठीण) (जून-२०२२)

4.   तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाचे कारण काय होते? (मध्यम)

5.   १८३९ मध्ये पंजाबमधील राजकीय अराजकतेचे कारण काय होते? (मध्यम)

6.   पहिल्या अँग्लो-मराठा युद्धानंतर पेशवा कोण बनला? (मध्यम) (सप्टेंबर-२०२२)

III. खालील प्रश्नांची दोन ते चार वाक्यांत उत्तरे द्या.

1.    भारतात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या धोरणांचा अवलंब केला? (सोपे)

2.   पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाची कारणे काय होती? (मध्यम)

3.   तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाची कारणे काय होती? (मध्यम)

4.   तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाचे परिणाम काय होते? (मध्यम)

5.   दत्तक वारस नामंजूर धोरणाने (Doctrine of Lapse) ब्रिटिश सत्तेच्या विस्तारास कशी मदत केली? (कठीण)

IV. खालील प्रश्नांची प्रत्येकी सहा वाक्यांत उत्तरे द्या.

तैनाती फौजेच्या अटी काय होत्या? (मध्यम) (जून-२०२०, जून-२०२२, जून-२०२३, जून-२०२४, एप्रिल-२०२५, जून २०२५)


☀️इयत्ता - 10वी ♦️ 

⭕विषय समाज विज्ञान  

 🔰भाग -1

नमूना प्रश्नोत्तरे 

1.युरोपियनांचे भारतात आगमन


2.ब्रिटिश सत्तेचा विस्तार


3.भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम


4.म्हैसूरचे वडेयर आणि ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध


5.सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळी


6.सार्वजनिक प्रशासन - एक परिचय


7.भारतासमोरील आव्हाने आणि त्यांवरील उपाययोजना


8.सामाजिक स्तर


9.श्रम आणि आर्थिक जीवन


10.भारत -भौगोलिक स्थान आणि प्राकृतिक वैशिष्ट्ये


11.भारताचे हवामान


12.भारतातील माती


13.भारतातील अरण्य संपत्ती


14.भारतातील जलसाधन संपत्ती 


15.अर्थव्यवस्था आणि सरकार


16.बँकेचे व्यवहार


🛑CLASS -10

🔰Sub. - English (TL)

⭕Poem - Summary

🔰New Words

🌀Marathi Meaning

👇👇👇👇👇👇👇👇

https://www.smartguruji.net/2025/04/class-10-english-3rd-language-poems.html

Post a Comment

أحدث أقدم