/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

8th SS KALIKA CHETARIKE Learning Sheet 29,30(8वी समाज अध्ययन पत्रक 29,30) अध्ययन अंश 8.4 - ब्रिटीश सत्तेचा परिणाम

   

                                          अध्ययनांश 8.4   ब्रिटीश सत्तेचा परिणाम


अध्ययन निष्पत्ती 8.4 - भारतातील ब्रिटीश सत्तेच्या विस्ताराच्या परिणामांचे विश्लेषण करतील.
             सुमारे 300 वर्षापूर्वी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर ताबा मिळविला होता. संपत्तीच्या लालसेने ते भारतातील जनसामान्य लोक, शेतकरी आणि व्यापाऱ्यावर मोठया प्रमाणात कर लादत होते. जर कर भरले नाहीत. तर कठीण शिक्षा दिली जात असत प्रामुख्याने याचा परिणाम शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यावर होत असे. शेतात पिक येवा अगर न येवो अतिवृष्टी, अनावृष्टी किंवा दुष्काळ असो शेतकऱ्यांना कर वेळेतच द्यावा लागत असत.इ.स. 1793 मध्ये कायमधारा जमिनधारी पध्दतीच्या नावाखाली, जमिनदारांनाच जमिनीचा मालक मानला गेला त्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या पारंपारिक हक्कापासून दूर रहावे लागले. भाडेकरु (शेतकरी) दिलेल्या 10/11 भाग सरकारला जमा करत व 1/11 भाग आपल्याकडे ठेवत असत काही कारणास्तव जास्त कर लादला तर जास्तीचा कर आपणच ठेवून घेत असत. जर कर वेळेत भरला नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या जात असत.
           इ.स. 1820 साली थामस मन्रो मद्रासचा गव्हर्नर झाल्यानंतर त्याने जमिनदारी पध्दतीऐवजी रयतवारी पध्दत अमलात आणली. मद्रास आणि बाँबे प्रांतातील प्रदेशात आणि आसाम, कोडगू प्रांतातील बहुतेक भागामध्ये याची अंमलबजावणी केली. दक्षिण आणि नैऋत्य भारतात जमिनदार नसल्या कारणांनी जमिन करणारे (शेतकरी) करार करुन जमिनीचे मूल्यमापन करण्याची पध्दत लागू करण्यात आली. जमिन कर जास्त म्हणून जर ती जमिन कसत नसतील तर पडीक जमिन समजली जात असत. या पध्दतीत जो जमिन कसत तोच जमिनीचा मालक समजला जात त्यांना जमिन महसूल रोखीने द्यावा लागत असत.

            यानंतर आलेल्या गव्हर्नर विल्यम बेटींग याने गंगेच्या मैदानी प्रदेशात वायव्य भारत आणि मध्य भारताच्या काही भागात महलवारी पध्दत लागू केली ही पध्दत म्हणजे जमिनदारी आणि रयतवारी पध्दतीचे मिश्रण होय. या पध्दतीत एक किंवा एकापेक्षा जास्त गाव जोडून त्याला महल असे म्हणत आणि संबंधित क्षेत्राच्या प्रमुखाशी महसूल करार केला जात असे महलाच्या आधारे महसूलाचे वाटप करण्यात आले. जमिनीची मालकी शेतकऱ्यांना दिली असली तरी ती कायमची नव्हती जमिनीच्या आधारावर कर आकारणी केली जात असत. महलदार महसूल गोळा करीत असत हेच गावातील (प्रमुख) पुढे जमिनदार म्हणून ओळखू लागले.

अध्ययन पत्रक - 30
कृती क्रमांक 1: आजच्या जमिन नोंदणीशी संबंधित कागदपत्रकांच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया.
1) RTC – शेतकऱ्यांचे वैयक्तिक खासगी वहिवाट आणि धान्य माहिती.

2) नमुना 4 – प्रत्येक शेतकऱ्याचा हिस्सा समजण्यासाठी

3) नमुना 11 – एकूण जमिनीचे क्षेत्र,लागवडीचे खेत्र आणि एकूण आकार समजण्यासाठी

4) क्षेत्रनिहाय माहिती   – एका गावाचे मूळ कागदपत्रे यामध्ये गावाची एकूण जमीन , लागवड जमीन,लागवडीस अयोग्य जमीन,नदी,ओढे,तलाव,रस्ते इत्यादी संपूर्ण माहिती.     

🛑कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान 🛑

👉अध्ययन पत्रक 18,19 उत्तरे

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/ABZXnGpCoro


🛑कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान 🛑

👉अध्ययन पत्रक 20 उत्तरे

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/KyA3thWrhIE


🛑कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान 🛑

👉अध्ययन पत्रक 21,22 उत्तरे

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/CP8TdYm_9O0


👉अध्ययन पत्रक 61,62 उत्तरे

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3HBd1g5

 



                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा