कर्नाटक राज्य पाठ्यक्रम

माध्यम - मराठी 

नमूना प्रश्नोत्तरे 

 पाठ १ भारत गौरव गीत


या कवितेत कवी शाम कुरळे यांनी आपल्या भारत देशाचे खूप कौतुक केले आहे. आपला देश किती महान आहे, येथे अनेक धर्माचे आणि जातीचे लोक असले तरी ते सर्व एकोप्याने राहतात हे त्यांनी सांगितले आहे. हिमालयासारखा उंच पर्वत आणि गंगा नदीसारख्या पवित्र नद्या आपल्या देशात आहेत. अनेक शूर वीर स्त्री-पुरुषांनी या देशासाठी आपले प्राण दिले आहेत. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपला तिरंगा झेंडा आकाशात अभिमानाने फडकत आहे. कवीला पुन्हा जन्म मिळाल्यास याच भारतभूमीत मिळावा अशी इच्छा आहे, कारण ही आपली जन्मभूमी खूप प्रिय आहे.


स्वाध्याय (Swadhyay) - 

नवीन शब्दांचे अर्थ

 * गौरव - सन्मान, आदर

 * परि - प्रमाणे, सारखे

 * महान - खूप मोठा

 * शान - आदर, मान

 * उन्नत - उंच, मोठा

 * माथा - डोंगराचे वरचे टोक

 * वेचिले - दिले, अर्पण केले

 * वरदान - आशीर्वाद

अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

 1. कवी कोणाचे गौरव गीत गात आहे?

उत्तर -  कवी आपल्या भारत देशाचे गौरव गीत गात आहे.

 2. भारताची पावन नदी कोणती ?

 उत्तर -  भारताची पावन नदी गंगा माता आहे.

 3. आमचा देश कसा आहे?

उत्तर -  आमचा देश फळाफुलांचा आणि नरवीरांचा आहे.

 4. महात्मा गांधीजींचे नाव या कवितेत काय म्हणून आले आहे?

 उत्तर -  महात्मा गांधीजींचे नाव या कवितेत स्वातंत्र्यासाठी लढलेले 'बापू' म्हणून आले आहे.

 5. कवीला मरण कोणासाठी हवे आहे ?

  उत्तर - कवीला आपल्या जन्मभूमीसाठी मरण हवे आहे.

आ) खालील प्रश्नांची उत्तरे ३-४ वाक्यात लिही.

 1. कवी भारताला मानवतेचा विश्ववृक्ष असे का म्हणतो ?

उत्तर -   कवी भारताला मानवतेचा विश्ववृक्ष असे म्हणतो, कारण आपल्या देशात अनेक धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र आणि प्रेमाने राहतात. जसा एक मोठा वृक्ष सर्वांना सावली देतो, तसेच आपला देश सर्वांना एकत्र ठेवतो.

 2. देशासाठी कोणी प्राणांचे बलिदान दिले?

 उत्तर -  देशासाठी लक्ष्मी, अहिल्या आणि पन्ना यांच्यासारख्या वीर स्त्री-पुरुषांनी प्राणांचे बलिदान दिले.

 3. कवीला कशाबद्दल अभिमान आहे ?

 उत्तर -  कवीला आपला देश फळाफुलांचा आहे याचा अभिमान आहे. तसेच, हा देश नरवीरांचा आहे, ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले, याचाही त्यांना अभिमान आहे.

 4. कवीने कोणती इच्छा व्यक्त केली आहे?

 उत्तर -  कवीने अशी इच्छा व्यक्त केली आहे की, जर त्याला पुन्हा जन्म मिळाला तर तो याच भारतभूमीत मिळावा.

इ) समानार्थी शब्द लिही.

 * विश्व - जग

   माया - प्रेम 

 * वृक्ष - झाड

   निशाण - झेंडा

 * भूमी - जमीन

   जननी - आई

ई) विरुद्ध अर्थी शब्द लिही.

 * महान X लहान

   अभिमान X दुराभिमान / गर्व 

 * समान X भिन्न / वेगळे

   जन्म X मृत्यू

 * भिन्न X समान / सारखे

उ) जोड्या जुळवा.

उत्तर - 

 * मानवतेचा -             ड) विश्ववृक्ष

 * फळाफुलांचा -        इ) देश आमुचा

 * देशासाठी नरनारींनी - ब) वेचिले प्राण

 * नीलाकाशी - अ) फडके तिरंगी निशाण

 * जन्मभूमी तुजसाठी - क) मरणाचे वरदान


Post a Comment

أحدث أقدم